सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायालयात प्रलंबित असणार्या प्रकरणांचा बोजा कमी करण्यासाठी कामकाजांच्या दिवशी न्यायाधीशांना सुट्टी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली: सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायालयात प्रलंबित असणार्या प्रकरणांचा बोजा कमी करण्यासाठी कामकाजांच्या दिवशी न्यायाधीशांना सुट्टी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘नो लीव्ह’ फॉर्म्यूला सुरु केला आहे. सध्या देशात तीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित असून न्यायव्यवस्थेत अडथळा ठरत आहेत. यामुळेच न्याय मिळवण्यासाठी रांगेत उभ्या लोकांना प्रमाणापेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागत आहे.
३ ऑक्टोबरला सरन्यायाधीपदाची शपथ घेताच जस्टिस गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टमधील प्रलंबित करोडो प्रकरणांचे ओझे हलके करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे संकेत दिले होते.
पद स्विकारल्यानंतर आठवड्याभरात त्यांनी प्रत्येक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि दोन वरिष्ठ न्यायाधीशांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी तसेच जास्त काळ चालणार्या प्रकऱणांवर तोडगा काढण्याची गरज असल्याचे म्हटले.
सरन्यायाधीश गोगोई यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना कामकाजात कामचुकारपणा करणार्या न्यायाधीशांना कामकाजातून वगळण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना अशा न्यायाधीशांची माहिती देण्यास सांगितले आहे, जे कामकाजादरम्यान शिस्तीचे पालन करत नाहीत अशा न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालय स्वत: दखल घेईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सरन्यायाधीश गोगोई यांनी यावेळी उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच कनिष्ठ न्यायालयातील कोणत्याही न्यायालयीन अधिकार्याला आपातकालीन स्थिती वगळता कामकाजाच्या दिवशी सुट्टी न देण्यावर भर दिला. तसेच त्यांनी कामकाजाच्या दिवशी कोणत्याही सेमिनार किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ नये असेही म्हटले आहे. कारण यामुळे दुसर्या दिवशी होणार्या केसच्या सुनावणीवर तयारी करण्यासाठी मिळणारा वेळ कमी होतो.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर एका पत्राला उत्तर देताना, गोगोई यांनी न्यायाधीशांना कामकाजाच्या दिवशी एलटीसी घेण्यावरही बंदी आणली आहे. याचा अर्थ न्यायाधीशांना आता कुटुंबासोबत फिरायला जायचे असेल तर त्यांना खूप आधी प्लानिंग करावे लागणार आहे.
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.