-
वादग्रस्त वक्तव्ये करुन नेहमीच चर्चेच्या प्रकाशझोतात राहणारे भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करुन आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. एकंदरीत स्वामींचा इतिहास पाहता त्यांना वादग्रस्त वक्तव्याचे ‘स्वामी’ असेच म्हणावे लागेल. अलिगढ मुस्लीम विद्यापीठ हे आतंकवादी विचारधारेचा अड्डा असल्याचे वक्तव्य करुन स्वामी यांनी हळुच फुसुकली सोडली आहे.
वाचाळविरांच्या व बोलघेवड्यांच्या यादीत स्वामींचा प्रथम क्रमांक आहे. त्यांनी भाजपमध्ये येण्याआधी जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला होता. पक्षाचे अध्यक्ष तेच, सरचिटणीसही तेच. एककल्ली कारभार त्यांचा चालू होता. वादग्रस्त वक्तव्याच्या कुलंगड्या करुन त्यांनी वेळोवेळी आपली बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट केली आहे.
परंतु अलिगढ विद्यापीठ हे आतंकवादी विचारधारेचा अड्डा असल्याचे सांगताना आपण कुठली विचारधारा पोसत आहोत याचा त्यांनी गांभिर्याने विचार केलेला दिसत नाही. स्वतःचा पक्ष कुठल्याही तर्हेने देशामध्ये रुजला नाही. म्हणून त्यांनी आढेवेढे घेत भाजपसारख्या पक्षात प्रवेश केला. आपला पक्ष?त्यांनी भाजपमध्ये विलीन केला.
भाजपच्या कमळाला जवळ करताना आपण कुठली विचारधारा स्विकारत आहोत त्याबद्दल कुठलेही मनात विचार आणले नाहीत. अलिगढ मुस्लीम विद्यापीठ हे जर आतंकवादी विचारांचा अड्डा असेल तर स्वामी तुम्ही?ज्या पक्षात काम करत आहात त्या पक्षाची मातृसंस्था असलेला आरएसएस हा आतंकवादी विचारांचा अड्डा नाही का? कारण हिंदुत्ववाद जोपासण्यात आणि तो फोफावण्यात आरएसएससारखी संघटना जबाबदार आहे.
मक्का मश्जीद बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट यासारख्या आतंकवादी कारवायांमध्ये आरएसएससंबंधित लोकं सहभागी होते. एवढेच कशाला १ जानेवारी २०१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत मिलिंद एकबोटे, मनोहर कुलकर्णी या आरएसएसशी लागेबांधे असलेल्या लोकांनी दंगल पेटविली. गुजरातमधील २००२ ची दंगल तेव्हाचे मुख्यमंत्री व आत्ताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात झाली.
समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटासाठी आरएसएसच्या बगलबच्च्यांचा वापर करण्यात आला होता. मालेगाव स्फोटातील संबंधित कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हे देखील आरएसएसशी संबंधित होते. यावर माजी आयपीएस अधिकारी एस.एम.मुश्रीफ यांनी आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे, अशा प्रकारचे पुस्तक लिहून आरएसएसचा बुरखा फाडला होता.
एवढ्या सर्व आरएसएससंबंधित घटना घडत असताना आरएसएस आतंकवाद्यांचा अड्डा आहे, असे कोणी म्हणाले तर ते वावगे वाटण्याचे कारण नाही. कारण आरएसएसचा इतिहासच आतंकवादाचा आहे. म्हणूनच देशामध्ये अशांतता कशी माजेल या दृष्टीने त्यांच्याकडून वेळोवेळी आखणी केली जाते आणि देशात बॉम्बस्फोट घडविले जातात. हिंदु-मुस्लीम असा भेदभाव केला जातो.
जाणीवपूर्वक फूट पाडली जाते. हा इतिहास स्वामी तुमच्यासारख्या लोकांना माहितच असेल, परंतु सत्तेमध्ये आंधळ्या झालेल्या तुमच्यासारख्या लोकांना केवळ मुस्लिमच दिसतात आणि त्यांनाच लक्ष्य केले जाते. वाचाळवीर स्वामी आपण एका राज्यसभेसारख्या ज्येष्ठ सभागृहाचे सदस्य आहात. त्यामुळे ज्येष्ठांनी कसे राहायला पाहिजे याची जाणीव मनात ठेवा.
तुम्हाला सन्मानपूर्वक राज्यसभेचे खासदारपद मिळाले आहेत. खासदार म्हणजे संसदेचा तो लोकप्रतिनिधी आहे. आपल्या सन्मानाला आदर राखत आपली भूमिका असायला हवी. परंतु आपली भूमिका नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये असते. त्यामुळे हे शोभादायक नाही.
भाजपने तुम्हाला पक्षात पावन करुन घेतले. याचा अर्थ काहीही बरळणे असा नव्हे. बरळणे हा तुमचा स्थायीभाव असेल तर त्या स्थायीभावाला मुरड घालायला हवी. परंतु मुरड घालण्याऐवजी आपण बेफामपणे नको ती वक्तव्ये करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करता. तुमच्या या वक्तव्याचा अलिगढ विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेने निषेध केला आहे.
विद्यापीठाच्या गौरवशाली प्रतिमेला कोणतेही पुरावे न देता ठेच पोहोचविल्याची टीका विद्यार्थी संघटनेचे मशकूर उस्मानी यांनी केली आहे. एका बाजूला अशातर्हेचे आपण वक्तव्य करत असताना दुसर्या बाजूला राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांचे वक्तव्य पाहिले असता तुम्ही कोविंद यांच्या वक्तव्यालाच छेद देत आहात असे दिसते.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठ हे धर्मनिरपेक्ष विचारधारा जपणारे विद्यापीठ आहे, असे कोविंद यांनी म्हटले होते. स्वामी वक्तव्य करत असताना स्वतःचे भान ठेवा. स्वतःचे भान न ठेवता केलेले वक्तव्य राजकीय कडेलोट करणारे असते. त्यामुळे आपली वाचाळविराची प्रतिमा बदलायची असेल तर संयमाने व धीराने आणि सद्सद्विवेक बुद्धीने बोलले पाहिजे.
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.