×

आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव

Published On :    1 Jul 2022
साझा करें:

अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा तुटवडा, पुरामुळे बाधित ३१.५४ लाख लोक



गुवाहाटी : आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कछार जिल्ह्यातील सिलचर दहा दिवसांपासून पाण्याखाली असून तेथील  रहिवाशांना अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अरुणाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.


आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. आसाममधील पूरपरिस्थिती बुधवारी गंभीर झाली आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित लोकांची संख्या ३१.५४ लाख झाली. त्याच वेळी, पूरसंबंधित घटनांमध्ये राज्यात आणखी १२ जणांचा मृत्यू झाला, तर कछार जिल्ह्यातील सिलचर शहरातील बहुतेक भाग गेल्या १० दिवसांपासून पाण्याखाली गेले आहेत.


आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक बुलेटिन जारी करून म्हटले आहे की पुरात ११ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि एक व्यक्ती भूस्खलनात आहे. कछर आणि चिरांग जिल्ह्यात प्रत्येकी दोन मृत्यूची नोंद झाली आहे, तर बारपेटा, विश्वनाथ, दरंग, धेमाजी, गोलाघाट, कामरूप, लखीमपूर आणि नागावमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. 


यासह राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या १५१ वर पोहोचली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या ३१.५४ लाख झाली आहे, जी एका दिवसापूर्वी २४.९२ लाखांच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे. ब्रह्मपुत्रा, बेकी, कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ईव्हीएम घोटाळ्यावरील चर्चेला डायव्हर्ट करण्यासाठी कें
भाजपा ईव्हीएम मॅनेज करते
‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘द केरला स्टोरी’ संघाचा सरळ अजे
चिंताजनक: राज्यात २४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य, ६० हजार श
वृत्तपत्रात जाहीरात न देण्यासाठी राजकीय पक्षांवर बडगा
महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, तीन महिन्यात
बीएमपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेन्द्र प्रताप सिंग यांच
पाटणा उच्च न्यायालयाची जातनिहाय सर्वेक्षणाला स्थगिती
उद्धव ठाकरे शेंडी-जानव्याचा उल्लेख करत असल्याने अल्पसं
छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण!
आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथा, पांढरपेशे असा उल्ल
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या भारत बंदने शासक वर्गाच
केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारविरोधात राष्ट्रीय पिछडा व
बरेच न्यायाधीश आळशी, वेळेवर निकाल लिहित नाहीत
ब्राम्हणांना महात्मा फुले यांच्या नावाची भीती का वाटते?
परिवर्तनाची मशाल पेटवणारे महात्मा फुले
ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला पुन्हा तारीख
देशाला बेेरोजगारीचा विळखा, कोरोनाने अर्थव्यवस्था गेली
न्यायदानात कर्नाटक अव्वलस्थानी! महाराष्ट्र ११ व्या स्थ
भारतात सामाजिक न्यायापेक्षा सामाजिक बदलानेच समस्यांचे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper