×

ईव्हीएम घोटाळ्यावरील चर्चेला डायव्हर्ट करण्यासाठी केंद्राची नवीन थेरं

Published On :    24 May 2023
साझा करें:

जन्म आणि मृत्यूची माहिती मतदार यादीशी जोडण्यासाठी विधेयक आणणार



नवी दिल्ली: ईव्हीएम घोटाळ्यावरील चर्चेला डायव्हर्ट करण्यासाठी केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने नवीन थेरं केली असून जन्म आणि मृत्यूची माहिती मतदार यादीशी जोडण्यासाठी विधेयक आणणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मतदार यादीतून मतदारांची नावे गायब होण्याच्या प्रकाराला आळा बसणार असल्याचा कांगावा करण्यात आला आहे.


आता मतदार यादीत नाव आपोआप जोडले जाईल आणि काढून टाकले जाणार आहे. निवडणुकीपूर्वी अनेक वेळा मतदार यादीतील अनियमिततेची प्रकरणे समोर येतात. वेगवेगळ्या निवडणुकांदरम्यान मतदार यादीतून लोकांची नावे गायब होतात. याशिवाय काही वेळा मृत व्यक्तींची नावेही मतदार यादीत आढळून येतात. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकार पाऊल उचलत आहे. जन्म आणि मृत्यूची माहिती मतदार यादीशी जोडण्यासाठी संसदेत विधेयक मांडण्याचा विचार करत आहे. असे केल्यास मतदार यादीतील त्रुटी दूर करता येतील. 


जनगणना भवनाच्या उद्घाटनानंतर गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, जनगणनेच्या डेटावर आधारित नियोजन हे सुनिश्चित करते की विकास सर्वात गरीब गरीबांपर्यंत पोहोचतो. जन्म-मृत्यू दाखल्यांचा डेटा विशेष पद्धतीने जतन केल्यास विकासकामांचे योग्य नियोजन करता येईल. जनगणना ही अशी प्रक्रिया आहे जी विकासाच्या अजेंड्याचा आधार बनू शकते. 


केंद्र सरकार संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये मृत्यू व जन्म नोंदणी मतदार यादीशी जोडली जाणार आहे. एखादी व्यक्ती १८ वर्षांची झाल्यावर त्याचे नाव मतदार यादीत आपोआप समाविष्ट होईल. याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले जाईल. इतकेच नाही तर, जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा १९६९ मध्ये सुधारणा करणारे विधेयक ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट जारी करणे, सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ लोकांना देणे इत्यादी बाबींना सुलभ करेल.


ईव्हीएम घोटाळ्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांचे मौन

ईव्हीएम घोटाळा करून केंद्रात कॉंग्रेस आणि भाजपा सत्तेवर येत आहे. हे भारतातील लोकांना कळले आहे. त्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी ईव्हीएम घोटाळ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली आहे. एवढेच नव्हे तर ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा काढून ईव्हीएम फोडण्यासाठी देशभरात १५ लाख लोकांना तयार केले जात आहे. त्यामुळे केंद्रातील केवल आरएसएस-भाजपाचे सरकार हादरले नसून केंद्रीय निवडणूक आयोगालादेखील चिंतेने ग्रासले आहे. जन्म आणि मृत्यूची माहिती मतदार यादीशी जोडण्यासाठी विधेयक आणणार असल्याचे गृहमंत्री शाह यांनी स्पष्ट केले असले तरी ईव्हीएम घोटाळ्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांत
शरद पवार आणि वामन मेश्राम एका मंचावर येण्याने भारतातील व
राजकारणात कधी सत्ता येते पण, जाते पण, पाय जमिनीवर चिकटून र
सर्व प्रमुख बँकांमधील कर्मचारी एकाच वेळी देशभरात संपाव
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper