विविध समाजात वैर वाढू शकते आणि एकतर्फी चित्रपट असल्याचे ओढले ताशेरे, चित्रपटाचे प्रमोशन करणार्या आरएसएस कंपूला व प्रधानमंत्री मोदींना चपराक
नवी दिल्ली: विविध समाजात वैर वाढू शकते आणि एकतर्फी चित्रपट असल्याचे ताशेरे ओढत सिंगापूर सरकारने ‘काश्मीर फाइल्स’वर या चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन करणार्या आरएसएस कंपूला व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना चांगलीच चपराक बसली आहे.
सिंगापूरच्या अधिकार्यांनी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घातली आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या समाजातील मतभेदांना प्रोत्साहन देऊ शकतो. एवढेच नाही तर त्याचे एकतर्फी वर्णनही केले आहे. काश्मीर फाइल्समध्ये ब्राम्हणांचा छळ होताना दाखवला गेला आहे, तर मुस्लिमांची बाजू एकतर्फी असल्याचे सिंगापूर सरकारचे म्हणणे आहे. हा चित्रपट भारतात ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता.
हे पण वाचा: गेल्या सहा वर्षात ९ लाख लोकांनी सोडले भारतीय नागरिकत्व
भारतातही सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली होती. या चित्रपटाचा अनेकांनी प्रचार केला त्यात आरएसएसप्रमुख मोहन भागवत व त्यांचा कंपू तसेच प्रधानमंत्री मोदीही आघाडीवर होते. हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात सांगितले गेले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली असली तरी सिंगापूरने विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर बंदी घातली आहे.
हे पण वाचा: यंदा ऑनलाईन जनगणना: ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार का? की पुन्हा पाने पुसणार
हा चित्रपट एकतर्फी असल्याचे सिंगापूर प्राधिकरणाचे मत आहे. सिंगापूरने इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट अथॉरिटी, संस्कृती, समुदाय आणि युवा मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या सहकार्याने एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या चित्रपटामुळे विविध समुदायांमधील वैर वाढू शकते, विविध धर्म मानणार्या समाजाची धार्मिक एकता बिघडू शकते. सिंगापूरमध्ये जाती आणि धार्मिक समुदायांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारी कोणतीही गोष्ट वर्गीकृत केली जाऊ शकत नाही असे सिंगापूरने म्हटले आहे. दरम्यान, हा चित्रपट बहुतांश भाजपशासित राज्यांमध्ये करमुक्त होता.
PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.