बामसेफचे संस्थापक सदस्य डी.के. खापर्डेसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील कार्यक्रमात डॉ.विलास खरात यांचा विश्वास
मुंबई: ब्राम्हणी शासन व्यवस्था उखडून फेकण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष केल्यास देशात क्रांती होईल असा विश्वास बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डॉ.विलास खरात यांनी व्यक्त केला. बामसेफचे संस्थापक सदस्य डी.के.खापर्डे यांच्या जयंतीनिमित्त मुंबई दादर येथील छबीलदास हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर बामसेफचे सीईसी सदस्य डी.डी.अंबादे, अनिलकुमार माने, रविंद्र येळींजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ.खरात म्हणाले, खापर्डेसाहेब सांगायचे की, व्यवस्था परिवर्तन झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी आणि मायनॉरिटी समुहाला जागवावे लागणार आहे. त्यांना महापुरूषांची विचारधारा सांगावी लागेल. हजारो वर्षाची ब्राम्हणी व्यवस्था उखडून फेकण्यासाठी सिद्धांत, मूळ उद्देश, नीती, नियम, संघटनेच्या नियमानुसार काम करावे लागणार आहे. लोकांच्या मनात चेतना जागृत करण्यासाठी महापुरूषांच्या विचारांची प्रेरणा सांगावी लागणार आहे. महापुरूषांच्या विचारधारेवर आपल्याला अंमल करावे लागणार आहे. त्यावेळी मोठे जनआंदोलन उभे राहू शकते. ब्राम्हणी शासन व्यवस्था उखडून फेकण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष केल्यास देशात क्रांती होईल.
देशात क्रांती होण्यासाठी लोकांना जागृत करत आहोत. म्हणून आमचा दुश्मन निर्धारित आहे. ब्राम्हण आमचा दुश्मन आहे. कारण या देशात ब्राम्हण विदेशी आहे. तो या देशातला नाही. आमच्या महापुरूषांची हत्या करणारा ब्राम्हणच आहे. बुद्ध आणि मौर्यकालीन विचारधारा पुढे आणण्यासाठी आपल्याला संघर्ष करावाच लागणार आहे. आम्ही एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी व व्हीजेएनटी आणि मायनॉरिटी म्हणजेच मूलनिवासी बहुजनांची लढाई लढत आहोत. भारतातील मूलनिवासी लोकांचे हक्क व अधिकार, मूल्य, न्याय, स्वातंत्र्यता, समता, बंधुता अशी शासन व्यवस्था आणण्यासाठी आम्ही लढाई लढत आहोत.
आज बामसेफचे संस्थापक सदस्य डी.के.खापर्डेसाहेबांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्याग, बलिदानाची किंमत चुकवल्याशिवाय व्यवस्था परिवर्तन होऊ शकत नाही. व्यवस्था परिवर्तनासाठी प्रत्येकाला लढायला हवे. संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. त्यासाठी निरंतर संघर्ष करणे गरजेचे आहे. ब्राम्हणवादाविरोधात लढायचे असेल तर मजबूत विचारधारेची आवश्यकता आहे. ती विचारधारा आपल्याकडे आहे. खापर्डेसाहेब सांगायचे, आपल्या लोकांना परिवर्तनाच्या गोष्टी करायला आवडतात. परंतु परिवर्तन व व्यवस्था बदलण्यासाठी स्वत: पुढे येत नाहीत.
त्याग केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. परिवर्तनाच्या गोष्टी चांगल्या वाटतात, तर महापुरूषांच्या विचारधारेवर काम करायला हवे. क्रांती करण्यासाठी पुढे यायला हवे. अशी क्रांती होत नाही. लोकांना जागृत करून जनआंदोलन उभे करायला लागते. महापुरूषांची विचारधारा लोकांना सांगून जागृती येते. म्हणून परिवर्तनासाठी प्रत्येकाला किंमत चुकवावी लागणार आहे. महापुरूषांच्या विचारांवर अंमलबजावणी करावी लागणार आहे. दुश्मनाला ओळखल्याशिवाय त्याच्याविरोधात मोठी लढाई लढू शकत नाही. त्यासाठी दुश्मनाची माहिती घेऊनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे, त्यासाठी नीती-नियम, सिद्धांत बनवावे लागतील असे डॉ.खरात यांनी सांगितले.
स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायासाठी तसेच बहुजन हिताय, बहुजन सुखाय नारा देत आपल्या घर-परिवाराचा सर्वात मोठा त्याग तथागत गौतम बुद्धांनी केला. बहुजनांसाठी त्यांनी सर्वात मोठे आंदोलन चालवले. महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले. त्यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून बहुजनांसाठी आंदोलन चालवले.
महात्मा फुले यांना त्यांच्या जातीतून बहिष्कृत करण्यात आले. परंतु ते काही घाबरले नाहीत. ब्राम्हणांचा त्यांनी निर्धाराने सामना केला. शाळा उघडून, लोकांना शिकवले. सावित्रीमाई फुले यांना पुढे आणून शाळा सुरू केल्या. आपल्या लक्ष्याच्या उद्देशपूर्तीसाठी महात्मा फुले यांनी समाजाला सोडून आपले आंदोलन चालवले. ब्राम्हणांनी फुले दाम्पत्याविरोधात कटकारस्थान केले. मात्र त्यांना रोखण्यात यश आले नाही. बहुजनांच्या हक्क व अधिकारासाठी आंदोलन केले त्याला त्यांनी सोडले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मूलनिवासी लोकांच्या स्वातंत्र्यासाठी फुले दाम्पत्यांनी निरंतर काम केले. ब्राम्हणांच्याविरोधात लढत राहिले असे डॉ.खरात यांनी स्पष्ट केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वच ओळखतात. बाबासाहेबांनी सार्या समाजासाठी व भारतासाठी एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, मायनॉरिटीच्या स्वातंत्र्यासाठी आपले घर-दार, संसार, चार मुलेही त्यागली. आपल्या सार्या जीवनाचा त्यांनी मूलनिवासी बहुजनांसाठी त्याग केला. दुश्मन ब्राम्हणाच्या गुलामीतून ते मुक्त करत होते. ते विदेशात जाऊनही बहुजनांसाठी ते विचार करत असत. त्यांच्यासाठी लिहत होतेे. त्यांचा संघर्ष हा शिकण्यासारखा आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, हे जे आम्ही काम करत आहोत, ते पवित्र आहे. कारण ज्या जातीत व समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाला ब्राम्हणाच्या गुलामीतून मुक्त करणे, त्यांना स्वातंत्र्य करणे याचे त्यांनी लक्ष्य व उद्देश निर्धारित केले होते. आपल्या लक्ष्य व निर्धारित उद्देशाप्रती ते इमानदारीने लढाई लढत होते. म्हणून आपणही लक्ष्य निर्धारित करून इमानदारीने काम केल्यास समाजाचा उद्धार होऊ शकतो. जोपर्यंत आपले लक्ष्य व उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ब्राम्हणाशी लढायला हवे, निरंतर संघर्ष करायला हवा असे डॉ.आंबेडकर म्हणायचे.
आताही आपल्याला आंदोलनाचा उद्देश पूर्ण होईपर्यंत संघर्ष करावा लागणार असून तरच क्रांती होऊ शकते. कुठलीही तयारी, त्याग व संघर्षाशिवाय आंदोलन पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी ब्राम्हणी शासन व्यवस्था उखडून फेकण्यासाठी आम्ही आंदोलन चालवत आहोत. व्यवस्था परिवर्तनाचे आंदोलन सार्या देशभरात फैलावे लागणार आहे. ब्राम्हण दुश्मन निर्धारित असल्याने त्याच्या पराभवासाठी कंबर कसावी लागणार आहे असे आवाहन डॉ.खरात यांनी केले.
PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.