पुराव्याच्या आधारे डाक्युमेंटरी-इंदर प्रित सिंह यांनी एमएनटीव्हीशी साधला संवाद
नवी दिल्ली: १९८४ च्या शीख दंगलीवर आधारित एक डाक्युमेंटरी बनवण्यात आली असून ती डाक्युमेंटरी रिलीज होऊ नये म्हणून काही शक्तींकडून दबाव टाकला जात आहे. ही डाक्युमेंटरी कमाईसाठी नसून खरी वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी आहे असे डाक्युमेंटरीवर काम करणारे इंदर प्रित सिंह यांनी सांगितले. त्यांची मुलाखत एमएनटीव्हीचे पत्रकार चरणजित सिंह यांनी घेतली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना इंदर प्रित सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
पहिल्यादेखील फिल्म आलेल्या आहेत, आता त्याची गरज का वाटली? या प्रश्नावर इंदर प्रित सिंह म्हणाले, यापूर्वी कुणी ऐकली नाही आणि पाहिली नाही अशी आम्हांला डाक्युमेंटरी बनवायची होती. आम्ही पुरावे गोळा करत गेलो, अन्यायग्रस्त व आंदोलनातील लोक मिळत गेले. सारा कंटेट समोर आल्यानंतर डाक्युमेंटरी बनवण्यात आली. ही डाक्युमेंटरी एक पुरावा समोर आला आहे. म्हणजे तो कायदेशीर असो, अथवा जीवनात स्थीर होण्यासाठी हे कामाला येईल.
अशा किती कुटुंबाशी आपण चर्चा केली आहे? या प्रश्नावर इंदर प्रित सिंह म्हणाले, आम्ही कमीतकमी दिल्लीत १५० कुटुंबाशी चर्चा केली आहे. सर्वच्या सर्व दिल्लीतील आहेत. कारण आम्ही दिल्लीतील लोकांशी काय संबंध आहे, याबाबत माहितीची सांगड घालण्यात आली आहे. पंजाबशी जोडलेले नाही. ही डाक्युमेंटरी रिलीज न करण्यासाठी दबाव टाकला जात आहे, तो दबाव कुणाकडून आहे? या प्रश्नाला उत्तर देताना इंदर प्रित सिंह यांनी सांगितले की, दबावसाठी अनेक अशा संघटना आहेत, ३८ वर्षात अनेक लोकांनी खरी माहिती न सांगता खोटी माहितीच सांगितली आहे. केवळ आपलेच घोडे दामटले आहे. वस्तुस्थिती मागे सोडलेली आहे. मात्र खरी बाब समोर आल्यास ज्या लोकांना मदत पाहिजे आणि जे लोक मदत करू इच्छितात ते आमने-सामने येतील. त्यामुळे आमचा जो उद्देश आहे तो पुरा होईल.
१९८४ मध्ये मोठे कांड झाले तेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते, आपण जे संशोधन केले तेव्हा कुठल्या विरोधकांचा रोल होता का? या प्रश्नावर इंदर प्रित सिंह म्हणाले, हे बघा, ३८ वर्षे झाली आहेत, एवढ्या वर्षात अनेक सरकारे बदलली आहेत. एवढ्या वर्षानंतरही आर्थिक असमानता, स्थलांतरितांचा मुद्दा असो, त्याबाबत काहीच करण्यात आलेले नाही. आता विद्यमान सरकारांनी ही डाक्युमेंटरी पहावी, त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया जी धीमी आहे त्याला गती आणण्यासाठी काम करण्याची गरज आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्यासंदर्भात ज्या लोकांना मदत हवी आहे, ती मदत अन्यायग्रस्तांपर्यंत पोहचली पाहिजे. सर्व सरकारांना आमचे आवाहन आहे.
काश्मीर पंडीतावरील ‘काश्मीर फाईल्स’वरून मोठा विवाद निर्माण झाला, तर या डाक्युमेंटरी संदर्भात काय होईल? या प्रश्नावर इंदर प्रित सिंह यांनी सांगितले की, ती फिल्मच्या फॉर्मवर होती. मात्र ही डाक्युमेंटरी खरी आहे. जे पीडित आहेत, त्यांची ही व्यथा आहे. ३८ वर्षानंतर राजधानी दिल्लीत अशी हालत आहे तर जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत ज्या दंगली झाल्या आहेत, पंजाबमध्ये झाल्या, बाकी सार्या देशात काय हालत असेल, भगवानच जाणो.
सरकारला काय संदेश देणार आणि जे लोक बघणार आहेत, त्यांनाही काय संदेश देणार? या प्रश्नावर इंदर प्रित सिंह यांनी जे पीडित आहेत, त्यांना मदत करावी, कारण त्यांचे स्थलांतर रखडले आहे. लंगरसेवेच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी काम करायला हवे. आंतरराष्ट्रीय एनआरआय कम्युनिटीने हा विषय युनोमध्ये घेऊन गेले पाहिजे. केंद्र सरकारने आमचे आवाहन ऐकले पाहिजे. पार्लमेंटमध्ये हे दाखवले पाहिजे. फास्ट ट्रॅकवर कायदेशीर कारवाई करायला हवी. नाहीतर १५ वर्षानंतर जे आरोपी व पीडित आहेत ते दोघेही वाचणार नाहीत.
ही डाक्युमेंटरी रिलीज न करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, समजा ही डाक्युमेंटरी रिलीज करू दिली नाही तर काय करणार? या प्रश्नावर इंदर प्रित सिंह म्हणाले, रिलीज करण्यासाठी आम्ही थियटरवर घेऊन जात नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर घेऊन जात आहोत. ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतंत्र आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही डाक्युमेंटरी आली नाही तर सार्या जगभरात ती दाखवली जाईल. ऑस्ट्रेलिया, युके, मध्य पूर्व, कॅनडा या देशात दाखवली जाईल. आमचा इंटरनॅशनल प्रॉडक्शन हाऊस आहे, लोकल नाही. आम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात जाऊन करू शकतो, कारण हा मुद्दा समाजासमोर आणून त्याचा खुलासा करणे गरजेचे आहे.
आपण जी डाक्युमेंटरी बनवली आहे ती कमाईसाठी की वातावरण निर्मितीसाठी? या प्रश्नाला उत्तर देताना इंदर प्रित सिंह म्हणाले, आम्ही ही कमाईसाठी बनवली नाही. तर गुरूद्वाराची सेवा करावी व आपल्या लोकांसाठी काय तरी केले पाहिजे, याच उद्देशातून ही डाक्युमेंटरी आहे. याचा कुठलाही व्यवसायिक दृष्टीकोन नाही. कारण मी जसे सांगितले की, ही कुठलीही स्क्रीप्टेट स्टोरी नाही. स्क्रीप्टेट डाक्युमेंटरी नाही. पुुराव्याच्या आधारे डाक्युमेंटरी आहे. आमच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याने ती डाक्युमेंटरी तर जाणे गरजेचे आहे. जिथे दबाव आहे तेथे कमाई कुठून आली? त्यामुळे अशाप्रकारे कुणाशीही घटना घडता कामा नये, एक उदाहरण समोर येणे गरजेचे आहे. ज्यातून जगभरातील लोक त्यातून धडा घेतील.
PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.