विदेशी ब्राम्हणांचा राष्ट्रवाद आतंकवादावर टिकलेला-‘द थिंक’ने घेतलेल्या मुलाखतीत डॉ.विलास खरात यांचा हल्लाबोल (भाग-२)
आपण खुलेआमपणे आरएसएसला आव्हान देत आहात. देशात लगातार ब्राम्हणवाद मजबूत होत आहे. अनेक राज्यात त्यांची सरकारे आहेत व केंद्रातदेखील आहे. आपल्याला भीती वाटत नाही? जीवाची बाजी लावून आपण हे सारे करत आहात. काय विचार करून तुम्ही त्यांना आव्हान देत आहात? एवढेच नाही तर तुम्ही त्यांना आतंकवादी म्हणता, आरएसएस एक आतंकवाद आहे. कुठल्या आधारावर त्यांना आतंकवादी म्हणता? या प्रश्नावर डॉ.खरात म्हणाले, पहिली बाब अशी आहे की, हिंदुत्व काय आहे? रूग्वेद, रामायण, महाभारत, शिवपुराण व विष्णूपुराणमध्ये हिंदू शब्द मिळत नाही.
हिंदू काय आहे? हिंदू शब्द संस्कृत भाषेचा शब्द नाही, भारतीय भाषेचा शब्द नाही. ज्यावेळी भारतात मुघल आले तेव्हा त्यांची जी बोलीभाषा होती पर्शियन. त्या पर्शियन भाषेचा हिंदू शब्द आहे. १८७३ मध्ये स्वामी दयानंद सरस्वतीने सत्यार्थ प्रकाश या पुस्तकात आर्य समाज स्थापित केले त्यामधील पान नं. ८१ वर लिहले की, हे आर्य ब्राम्हणो...! ‘तुम अपने आपको कभी भी हिंदू मत कहना’ कारण हिंदू मुघलांच्या माध्यमातून दिलेली शिवी आहे. त्याचा अर्थ आहे गुलाम, छळी, कपटी असा आहे. १८७३ मधील ब्राम्हण लोक हिंदू शब्दाचा स्विकार करत नव्हते तर आजचे ब्राम्हण हिंदू शब्दाचा स्विकार का करत आहेत? ही बाब एससी, एसटी, ओबीसीला माहित पडली आहे. अरे...! हे लोक शिवी देत आहेत.
हिंदू राज आले तर ओबीसीचा सत्यानाश थांबणार आहे का? एसटीचा सत्यानाश होत आहे. हिंदू राजचा दुसरा अर्थ ब्राम्हणांच्या अधीन राष्ट्र होय. म्हणजेच ब्राम्हणांचा १०० टक्के असलेला देश. १२ ऑगस्ट, २०२२ मध्ये टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आली की, हिंदू राष्ट्राचे संविधान तयार आहे. ते राष्ट्र वर्णव्यवस्थेवर लागू होईल. वर्णव्यवस्थेत काय ओबीसीला अधिकार आहेत? काय एससीला व एसटीला अधिकार आहेत? ही बाब समजून -उमजून घेणे गरजेचे आहे. आरएसएस आतंकवादी संघटन आहे असे आम्ही म्हणत आहोत असे आपण नवीन बाब सांगितली. परंतु आम्ही खुलेआमपणे बोलत आहोत, म्हणून तर मोर्चा घेऊन जात आहोत. त्यासाठीच कार्यालयाला घेराव करणार आहोत.
काही दिवसांपूर्वीच आरएसएसचा कार्यकर्ता असलेला बजरंग दलाचा मुंबईचा अध्यक्ष शिंदे याने नांदेड कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्याने असे म्हटले आहे की, आयबीचे ब्राम्हण लोक बॉम्ब बनवण्याचे व फोडण्याचे ४० दिवसांचे टे्रनिंग आरएसएसला दिले आहे. आतंकवादी बनवण्याचे ट्रेनिंग देण्याचे काम आरएसएस करत आहे. गुन्हा करताना ते ओरिजिनल नाव ठेवत नाहीत तर ड्युप्लीकेट नाव ठेवतात. करकरे यांच्या माध्यमातून ज्यावेळी ही बाब लिक झाली तेव्हा मिथुन चक्रवर्तीने ट्रेनिंग दिले. मिथुन चक्रवर्ती तर हिरो आहे. मिथुन चक्रवर्ती बॉम्बस्फोटाचे ट्रेनिंग देणार. देव नावाचा जो आयबीचा अधिकारी आहे त्याने बॉम्बस्फोट घडवण्याचे ट्रेनिंग आरएसएस मुख्यालयात दिले.
प्रज्ञा ठाकूर कोण आहे? तर आज भाजपाची खासदार आहे. तिने टेलिफोनवर सांगितले तिचा फोन टॅपिंग रेकॉर्ड कोर्टात आहे. तिने सांगितले की, माझी जी स्कूटर दिली त्यामध्ये आरडीएक्स ठेवलेले होते. थोडे लांब का ठेवले? थोडे आतमध्ये का ठेवले नाही? मालेगाव मशिदीत जास्त लोक का नाही मेले? भाजपाच्या लोकांनी तिला निवडून पाठवले, तर आरएसएसच्या लोकांनी तिला बक्षीस दिले ना. लेक्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला भाजपाची सत्ता आल्यानंतर बाहेर करण्यात आले. असीमानंदला बाहेर काढले. रमेश उपाध्यायला निवडणूक लढवायला परवानगी दिली. सारा खेळ हा ब्राम्हणांचा आहे. ब्राम्हण हिंदू राष्ट्र अथवा देशभक्तीचा नारा लावतात, त्यांचा राष्ट्रवाद आतंकवादावर टिकलेला आहे. ते राष्ट्रवादी लोक नाहीत, ज्यांचा डीएनए विदेशी आहे, ते राष्ट्रवाद शिकवणार का? जे या देशातीलच नाहीत ते काय देशभक्तीचे सर्टीफिकेट वाटणार?
आम्ही सांगत होतो, आता आम्ही ६ ऑक्टोबरला मोर्चाच घेऊन जाणार आहोत. १३ मुद्दे आहेत, त्यामध्ये प्रमुख मुद्दा असा आहे की, आरएसएसपासून देशाला धोका आहे. कारण ते आतंकवादी संघटन आहे. त्यांचे कुठलेही रजिस्ट्रेशन नाही. आरएसएस कुठलीही पंजीकृत संस्था नाही. आरएसएसचे कुठलेही ऑडिट होत नाही. आरएसएसला कुठून पैसा येतो, त्या पैशांचा विनियोग कुठे आणि कसा करतात? ही चौकशी मालेगाव बॉम्बस्फोटानंतर सुरू झाली होती. ते सर्व ठप्प आहे. कॉंग्रेसच्या लोकांनी त्यांना वाचवले. कारण सारे ब्राम्हण लोक एमकेकांशी मिळून आहेत. त्यामुळे केवळ आम्हीच नाही तर जगातील लोक म्हणत आहेत की, आरएसएस आतंकवादी संघटन आहे. जगातील लोकही मानत आहेत. भारतात उठाव करण्यासाठी आरएसएस मुख्यालयावरच मोर्चा काढणे गरजेचे आहे. त्याची जास्त गरज आहे. या बाबीला स्विकार करत आहेत.
तमाम बाबी ऐकल्यानंतर मुद्दा जास्त गंभीर आहे, मात्र या देशातील एससी, एसटी, ओबीसी ज्याला बहुजन समाज म्हणू शकतो. मूलनिवासीदेखील म्हणू शकतो. यामधील काही लोक स्वत:ला हिंदू मानतात व त्यांना गौरव वाटतो. ‘गर्व से कहो हिंदू है’ असा नारादेखील लावतात, खासकरून ओबीसीदेखील स्वत:ला म्हणवतो ‘गर्व से कहो हिंदू है’. तर ‘हिंदू खतरे में’ हादेखील मामला समोर आणण्यात आला आहे. राम मंदिराचादेखील मामला सुरू आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसीची जी मानसिक गुलामी दृढ होत आहे. जसे आपण संशोधन करत आहात तर हे तर शुद्र-अतिशुद्र लोक आहेत. मात्र हिंदूच्या नावावर त्यांचे एकत्रीकरण केले जात आहे. ही गुलामी समाप्त करण्यासाठी काय उपाय आहे?
या प्रश्नावर डॉ.खरात यांनी सांगितले की, समजण्यासाठी एक उदाहरण देत आहे. नागपुरात एक माणसाने दुकान उघडले. दुकानाचे नाव ठेवले हिंदू जनरल स्टोअर्स. हिंदू किराणा दुकान. तेथे एक तरूण गेला. दुकानदाराच्या मालकाचे नाव होते मोहन भागवत. मोहन भागवतने किराणाचे दुकान उघडले व त्या दुकानाचे नाव ठेवले हिंदू किराणा दुकान. तो तरूण भागवतला म्हणाला, भागवतजी, मला १० किलो हिंदू पार्सल बांधून द्या. त्यावर भागवत म्हणाले, नाव तर हिंदू जनरल स्टोअर्स आहे मात्र येथे कुठलीही हिंदू नावाची वस्तू मिळत नाही. हिंदू किराणा दुकानात प्रत्येक वस्तू मिळेल परंतु या दुकानात हिंदू नावाची वस्तू मिळणार नाही. तुम्ही हिंदू आहात तर ६.५ हजार जातींचे तुकडे का बनवले? पहिले तर त्यांच्या धर्मग्रंथात हिंदू का नाही? तुमची ओळख कुठून येणार?
जातीत विभागलेल्या समाजाला फुले, शाहू, आंबेडकरांनी एकत्रित केले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या आंदोलनामुळेच भारताचे संविधान बनले. आज एससी, एसटी, ओबीसीमध्ये एवढी जागृती आली की, आदिवासी लोक मोहन भागवतच्या तोंडावर सांगत आहेत की आम्ही हिंदू नाही. हे आमचे सैनीजी आहेत. खुलेआमपणे सांगत आहेत की, तुम्ही आम्हांला शिव्या देत आहात. ते एवढेच सांगत नाहीत तर आम्ही आमच्या लोकांना जागृत करू. कुठला ब्राम्हण आमच्या लोकांना हिंदू बोलत असेल तर पहिल्यांदा त्याची पिटाई करू व त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ. ज्यावेळी तुम्ही बोलत होतात तेव्हा आमचा समाज अज्ञानी होता. आता आमचा समाज सज्ञानी झाला आहे. ही तर हिंदू नामक घाण शिवी आहे. परिवर्तन होत आहे. हिंदू हा डावपेच आहे. हिंदू हा उद्देश नाही. हिंदूचा अर्थ गुलाम आहे. ब्राम्हणांचे गुलाम राष्ट्र ते बनवू इच्छितात.
देशात ३.५ टक्के ब्राम्हण आहेत, परंतु देशाचे सारे नियंत्रण त्यांच्या हातात आहे. आज तेच लोक जे आरक्षणाला विरोध करत आहेत, ज्या दिवसापासून आरक्षणाची व्यवस्था लागू झाल्यापासून ते विरोध करत आहेत. आता ईडब्लूएस नावावर ३० टक्के आरक्षणाची मागणी ते करत आहेत. देशात आदिवासींच्या विस्थापनाचा विषय आहे. ओबीसी आरक्षणाचा व जनगणनेचा विषय आहे. मात्र नवीन मागणी येत आहे त्यावर आपण कसा विचार करत आहात? या प्रश्नावर डॉ.खरात यांनी सांगितले की, आता सर्वाच्च न्यायालयात या विषयावर सुनावणी सुरू आहे.
भारताच्या संविधानात आणखी काही बाबी आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतील लोकही चुकीचे काम करत आहेत. सवर्ण बिलाच्या नावावर जे ठेवण्यात आले आहे ते ५० टक्क्यांच्या कॅपच्यावर वर आहे. त्यामुळे ते असंविधानिक आहे. कारण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत आहे. हरियाणात जाट आरक्षणाचा विषय ज्वलंत आहे. गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचा विषय आहे आणि गुजरातमध्ये निवडणूक देखील आहे. न्यायालय सांगत आहे की, ५० टक्क्यांच्यावर जाता कामा नये, मात्र संविधानात असे कुठेही लिहलेले नाही. आरक्षणाची सीमा ५० टक्के आहे. ज्यांची ज्या प्रमाणात लोकसंख्या आहेत तेवढी त्याची भागीदारी असेल असे संविधान सांगते. आमचे म्हणणे असे आहे की, ३.५ टक्के ब्राम्हणांनी ३.५ टक्के घ्यायला हवे. मात्र संसदेवर तुम्ही कब्जा करत आहात, ज्यांच्याकडे गावचा सरपंच निवडून येण्याची औकात नाही त्यांचे पाच राष्ट्रीय दल कसे काय बनले? संसदेवर तुम्ही कब्जा केलेला आहे. आजच मध्यप्रदेशचा विषय आला, आपल्या आदिवासी समाजाचा प्रश्न विचारण्यासाठी विधानसभेत जात होता, कॉंग्रेसचा आमदार होता, त्याची पिटाई करण्यात आली. माझी पिटाई करण्यात आली तो रडून सांगत होता. माझ्या माणसाला मारले यावर राहुल गांधी हे काहीच बोलले नाही. आमच्या माणसाला मारले असे त्यांच्या प्रवक्त्याने येऊन सांगितले नाही.
एससी, एसटी, ओबीसीचे आमदार झाले तरी त्यांचीदेखील कुणी ऐकून घेणारे नाही. संसदेवर कब्जा, ब्युरोकॅ्रटसवर १०० टक्के ब्राम्हणांचा कब्जा, ८९ टक्के ब्राम्हणांचा कब्जा, संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता. न्यायपालिकेवर वन साईड ब्राम्हणांचा कब्जा, हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालयात सारेच्या सारे ब्राम्हण आहेत. दोन वर्षापूर्वी एक बातमी आली होती, की ‘एव्हरी सिक्स जज इज अंकल सिंड्रोम’ म्हणजेच प्रत्येक सहावा जज कुठल्या कुठल्या तरी परिवाराचा हिस्सा आहे. एवढी न्यायपालिका सडलेली आहे. मीडिया ब्राम्हण-बनिया यांची आहे. जसे शेतीतून जनावरांना हाकलले जाते तसेच लोकतंत्रात एससी, एसटी, ओबीसी व मायनॉरिटीला हाकलले गेले आहे.
न्यायपालिका म्हणते ईडब्लूएस असंविधानिक आहे हे आम्ही मानतो. ही बाब आम्ही मानतो. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण आहे. हाच आरक्षणाचा आधार आहे. आर्थिक आधार नाही. त्यानंतरही कुठलेही आंदोलन न करता सवर्ण बिल म्हणून लागू करण्यात आले. वेगवेगळ्या राज्यात मराठा, जाट, पटेल आंदोलन करत आहेत त्यांचे तोंड दाबण्यासाठी ही चर्चा केली जात आहे. ही बाब आम्ही मानू शकत नाही. आर्थिक आधारावर आरक्षण नाही या बाबीचा आम्ही समर्थन करू. दुसर्या बाजूला तुम्ही खासगीकरण करत आहात, खासगीकरणात आरक्षण झिरो आहे.
खासगीकरणात आरक्षण झिरो होईल तर किती मिळेल? त्यासाठी न्यायपालिका काय म्हणत आहे? आर्थिक आधारावर ५० टक्के बोलत आहात. सारे क्षेत्रात त्यांचे सुरू आहे. परिक्षेशिवाय आयएएसदेखील पडद्यामागून घेत आहेत. रेल्वे विकली. सर्व सरकारी आस्थापने विकण्यात आली. त्यामुळे न्यायपालिकादेखील संविधानाच्या हितासाठी बोलत नाही. त्यांना बोलावे लागते. मागच्या वेळी बिहारची निवडणूक असताना मोहन भागवत म्हणाले होते की, आम्ही आरक्षणाला त्या उंचीवर घेऊन जाऊ की आरक्षणाचे कोणी नावच घेणार नाही. दुश्मन त्या लाईनवर काम करत आहे. दाखवायला वेगळेच आहे आणि आतमध्ये स्टोरी वेगळीच आहे. न्यायपालिका आरक्षण वाचवण्यासाठी निर्णय देत नाही. तर मराठा, पटेल, जाट यांना आरक्षण मिळू नये याची तयारी करत आहे.
देशात एक विद्रोहाला चालना व प्रेरणा मिळेल यासाठी एससी, एसटी, ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांकांना काय संदेश द्याल? त्यावर डॉ. खरात म्हणाले, मी माझ्या मूलनिवासी बहुजन बांधवांना एवढाच संदेश देऊ इच्छितो की, ६ ऑक्टोबरला आम्ही निर्णय घेणार आहोत. त्या निर्णयासाठी आपण सर्वांनी नागपूरला यावे. बेजेन बाग ग्राऊंडवरून आम्ही निघणार आहोत. देशाची हालत व परिस्थिती विपरित आहे. मात्र घाबरण्याचे कारण नाही. ३.५ टक्के ब्राम्हणांच्याविरोधात आम्ही ८५ टक्के लोक मैदानात एकत्र आलो तर त्यांना फुंकर मारून उडवता येईल.
आम्हांला भीती का वाटत नाही तर आमच्याकडील साधन-संसाधन समाप्त करण्यात आले आहेत. पहिले नव्हतेच, ज्याच्याकडे साधन-सत्ता-संपत्ती आहे त्याला भीती वाटते. भागवत घाबरला आहे. तो प्रतिक्रिया करत आहे. पहिले आमच्या समाजाचे लोक प्रतिक्रिया करायचे. आता भागवत प्रतिक्रिया करत आहे. त्यामुळे येणार्या ६ ऑक्टोबरला समाजाला एक नवीन दिशा मिळणार आहे. समाज आमच्याकडे आशा लावून आमच्या आंदोलनाकडे पाहत आहे. या आंदोलनाला साथ सहयोग द्या. आता अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी बामसेफची बहुजन क्रांती मोर्चा फ्रंटल संघटन विंग आहे. आमच्या समाजात जेवढ्या संघटना आहेत त्यांनी आपला झेंडा, दांडा, बॅनर घेऊन या, आपला अजेंडा व आमचा अजेंडा कॉमन आहे. देशाचे संविधान राहिले तर आम्ही बोलू शकतो. तरच आम्ही लढाई लढू शकतो. त्यामुळे ‘द थिंक’चॅनेलच्या माध्यमातून मी दिलेला संदेश खोलवर समजून घ्या असे डॉ.खरात यांनी सांगितले.
PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.