एकंदरीत त्यांची स्क्रीप्ट आरएसएस-भाजपाच्या कळपातून आली असावी याची दाट शक्यता आहे. कारण मुस्लिमविरोधी अजेंडा हा विदेशी ब्राम्हण आरएसएस-भाजपाचा या संघटनांचा आहे. त्याच अजेंड्यावर ते बोलणार असतील तर त्यांचे ‘राज’कारण हे भटाळलेलेच आहे हे लक्षात येते.
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना टाईमपास म्हणून पाहिले जाते अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मतदार नसलेल्या सेनेचे)प्रमुख राज ठाकरे यांचे ‘राज’कारण म्हणजे विध्वंसाचे, विद्वेषाचे आणि हिंदू-मुस्लिम या नेहमीच्याच स्टाईलने सुरू आहे. पक्षाला १७ वर्षे होऊनही राज्याच्या राजकारण जराही प्रभाव न पाडलेले राज ठाकरे केवळ हिंदू-मुस्लिम असाच ढोल पिटण्यात मश्गुल आहेत.
त्यांनी ज्या विषयांवर भाष्य केले त्यामध्ये धर्मांधता दिसून येते. त्यातून जाती-जातीत व धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचा प्रकार केला जात आहे. एकंदरीत त्यांची स्क्रीप्ट आरएसएस-भाजपाच्या कळपातून आली असावी याची दाट शक्यता आहे. कारण मुस्लिमविरोधी अजेंडा हा विदेशी ब्राम्हण आरएसएस-भाजपाचा या संघटनांचा आहे. त्याच अजेंड्यावर ते बोलणार असतील तर त्यांचे ‘राज’कारण हे भटाळलेलेच आहे हे लक्षात येते.
२००६ मध्ये ज्यावेळी मनसेची स्थापना करण्यात आली तेव्हा महाराष्ट्राच्या विकासाची माझ्याकडे ब्लू प्रिंट आहे अशी त्यांनी बतावणी केली होती. मग ठाकरे यांच्याकडे राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे तर त्यावर त्यांनी बोलायला हवे. मात्र त्यांची ब्लूू प्रिंट राहिली बाजूला धार्मिक द्वेषाचे मुद्दे उपस्थित करून मेंदू गहाण ठेवल्याचे समोर येते. केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून राज ठाकरे यांना राजकारणात यशस्वी होता येणार नाही.
तुमच्या भावांचा वाद असा राजकीय विचारपीठावर आणून राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का? मनसेची वाताहात का झाली? यावर विचारमंथन करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंवर आज परिस्थिती का ओढवली? यावर भाष्य करण्याची गरज काय? उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचे काय होईल, काय होणार नाही याबाबत निर्णय घेतीलच. याचा अर्थ उद्धव ठाकरे संपल्याशिवाय मनसेला स्पेस मिळणार नाही ही बिटवीन द लाईन आहे. म्हणून तुम्ही सातत्याने उद्धव यांच्यावर टीका करताना दिसत आहात.
राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्या करणार्यांमध्ये महाराष्ट्रासारखे राज्य आज देशभरात आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे. बेरोजगारी वाढली आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. राज्यातील उद्योग पळवले जात आहेत. अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाली आहे. एवढा गलितगात्र महाराष्ट्र कधीच नव्हता. महाराष्ट्रात आ वासून प्रश्न निर्माण केले गेले आहेत. या प्रश्नांवर फुंकर घालण्याऐवजी राज ठाकरे केवळ हिंदू-मुस्लिम पिपाणी वाजवताना दिसत आहेत.
आजच्या घडीला हिंदू-मुस्लिम पिपाणी केव्हाच मोडून पडली आहे. कारण लोक जागृत झाली आहेत. तुमची ‘राज’कीय पोळी भाजून घेण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करत असाल तर लोक हिंग लावून विचारणार नाहीत.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशीदीवरील भोंगा वाजवला आहे. त्यांनी हा मुद्दा गेल्यावर्षी हाती घेतला होता. मशीदीवरील भोंगा काढा नाहीतर आम्ही काढू अशी धमकीच त्यांनी दिली आहे. गेल्यावर्षी ज्या मनसैनिकांनी मशिदीवरील भोंगा उतरवण्याचा प्रयत्न केला, त्या १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे राज्य सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी राज यांनी केली आहे.
म्हणजे चिथावणीखोर भाषेच्या मायाजालात फसून जे मशीदीवरील भोंगे काढायला गेले १७ हजार युवकांवर गुन्हे दाखल झाले, त्यांच्या आयुष्याचे काय? एकदा गुन्हा दाखल झाला तर त्या युवकाचे आयुष्यच बरबाद होते. याचा दुसरा अर्थ युवकांचे आयुष्य बरबाद करण्याचे काम भटाळलेले ‘राज’कारण करत आहे. युवकांच्या अनेक पिढ्या बरबाद करण्याचा विडा राज ठाकरे यांनी उचलला आहे का? तुमच्या धर्मांततेच्या राजकारणात युवकांनी का फसावे?
बरं तुमच्या बोलघेवड्या राजकारणाने राज्याचे काय भले झाले? हातावर पोट असलेल्या युवकांना आधी हाताला काम द्या, ते राहिले बाजूला आणि त्यांच्या डोक्यात हिंदू-मुस्लिम असा द्वेष पसरवून स्वत:ची राजकीय पोळी भाजणारे तुम्ही काय विकास करणार? राज्याला कसली दिशा देणार? लाखोंच्या सभा होऊनही तुम्हांला निवडणुकीच्या वेळी हिंग लावून मतदार विचारत नसतानाचा धडा समोर असतानाही हिंदू-मुस्लिम अशी तीच टेप वारंवार वाजवत आहात.
राज ठाकरे आरएसएस-भाजपाची भाषा का बोलत आहेत? तर त्यांनाही ईडीची भीती आहे. मागे ईव्हीएमविरोधी मुद्दा उपस्थित करताच त्यांना कोहीनूर प्रकरणी ईडीची नोटीस आली, त्या नोटीसीनेच त्यांची चड्डी पिवळी झाली. त्या दिवसापासून राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात ‘ब्र’ देखील काढलेला नाही. त्या दिवसापासून ९० अंशाच्या कोनात बदलत वारंवार भूमिका बदलण्याचा प्रयत्न केला. मनसे केडर बेस संघटना नसल्याने ते दिशाहीन आहेत.
युवकांची माथी भडकावून त्यांच्या हातात दगड देऊन त्यांना ‘खळ खट्ट्याक’ करायला लावणे म्हणजे राजकीय मर्दुमकी नव्हे. युवकांच्या हातात दगड देणे सोपे आहे, मात्र त्या दगडाचा पाया रचून इमारत उभी करणे कठीण आहे. परंतु राज ठाकरेंना सांगणार कोण? कारण ज्यांच्या मेंदूवरच भटाळलेली जळमटे आहेत, ती जळमटे काढायची तर त्यांनी स्वत:च्या आजोबांना म्हणजे प्रबोधनकारांना वाचले पाहिजे. मात्र ज्यांना आपल्या आजोबांच्याच विचारांचे वावडे आहे, ते कसले करणार नवनिर्माण? केवळ द्वेषाचे राजकारण करून कितपत टिकाव धरणार? ज्यांच्या ‘राज’कारणाचा पायाच दुसर्या धर्माचा द्वेष आहे, त्यांचे राजकारण संपायला वेळ लागत नाही.
दिलीप बाईत
९२७०९६२६९८
PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.