×

केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारविरोधात राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा उद्या भारत बंद

Published On :    29 Apr 2023  By : MN Staff
शेयर करा:


जातनिहाय जनगणना न करणे हा ओबीसींचा सर्वात मोठा अपमान-चौधरी विकास पटेल





नवी दिल्ली: जातनिहाय जनगणना न करणे हा ओबीसींचा सर्वात मोठा अपमान असून केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारविरोधात चार चरणात आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती, त्यानुसार तीन चरणाचे आंदोलन झाले असून चौथ्या चरणातील दि. ३० एप्रिल, २०२३ रोजी भारत बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी दिले आहे.


चौधरी विकास पटेल म्हणाले, सरकारच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव केला जात आहे. तर दुसर्‍या बाजूला देशातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला ओबीसी ज्याला म्हणतात, त्यांची गणना केली जात नाही. मात्र जनावरांची गणना केली जात आहे. जनावरांची गणना करणे मात्र ओबीसींची गणना न करणे हा ओबीसीचा सर्वात मोठा अपमान आहे. 


आरएसएस-भाजपाकडून ओबीसींचा अपमान केला जात आहे असा डांगोरा पिटला जात आहे. जनावरांची गणना होते, मात्र ६० टक्के ओबीसीची गणना केली जात नाही. मात्र यापेक्षा कुठल्या मोठा अपमान असू शकतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वत: आपण ओबीसी असल्याचे सांगतात, मात्र त्यांची गणना न करणे हा ६० टक्के ओबीसींच्या हक्क व अधिकारापासून वंचित करण्याचे षड्यंत्र आहे. याविरोधात चार चरणात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार तीन चरणात आंदोलन झाले आहे.


एका बाजूला भाजपा सरकार ओबीसीला हक्क व अधिकारापासून वंचित ठेवत आहे. दर दुसर्‍या बाजूला जे.पी.नड्डा यांचेही वक्तव्य आले की, राहुल गांधी यांनी ओबीसींच्या विरोधात काम केले आहे. ओबीसींच्या जातींचा अपमान केला आहे. ओबीसींची गणना होऊ नये यासाठी स्वत: प्रतिज्ञापत्र भाजपा सरकारने दिले आहे, परंतु ते स्वत: मान्य करायला तयार नाहीत.


 राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले ते ओबीसींच्या संदर्भात नव्हते. ज्या लोकांनी देशाचा पैसा लुटला त्यामध्ये नीरव मोदी अथवा ललित मोदी असो, मेहुल चोक्सी सारख्या लुटेरेंविरोधात राहुल गांधी यांचे वक्तव्य होते. ज्यांनी देश लुटला त्यामध्ये नीरव मोदी अथवा ललित मोदी, मेहुल चोक्सी ओबीसी नाहीत. जे लुटेरे देश सोडून गेले आहेत, त्यामध्ये एकदेखील ओबीसी नाही. अशी परिस्थिती असताना भाजपाच्या अध्यक्षांकडून असे वक्तव्य करणे चुकीचे आहे.


नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी यांच्यावर सवाल उपस्थित करणे गैर काय? वास्तविक ओबीसींचा अपमान जे.पी.नड्डा यांनी केला आहे. चोर आणि लुटेरे असलेले लोक देशाचा पैसा लुटून विदेशात पसार झाले, त्यांचे सरकार या लोकांना भारतात आणण्यासाठी काहीच काम करत नाही, त्या चोर आणि लुटेर्‍यांसोबत ६० टक्के ओबीसींचे नाव जोडणे हा ओबीसींचा मोठा अपमान आहे. राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य ओबीसींचा अपमान नसून तर आरएसएस-भाजपा चोर व लुटेर्‍यांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी ओबीसींचा नाव जोडणे हे चुकीचे आहे. चोर व लुटेरे स्वत: ओबीसी नाहीत. त्यांचे नाव ओबीसींशी जोडणे हा ओबीसींचा सर्वात मोठा अपमान आहे. भाजपाचे लोक उत्तर देण्याच्या स्थितीत नाहीत, स्वत:ला लपवण्यासाठी ओबीसीचे नाव घेत आहेत. ओबीसीला पुढे करण्याचे काम करत आहेत. 


२०१४ मध्ये ज्यावेळी निवडणुका लागल्या तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी स्वत: पिछडा असल्याने माझा अपमान होत आहे. मोदी देशाचे प्रधानमंत्री बनले, परंतु त्यांनी ओबीसींचा सन्मान वाढवण्यासाठी कोणते मोठे काम केले? ३१४ ओबीसीची मुले युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाले होते त्यांच्या नियुक्त्या रोखल्या, काय हा ओबीसीचा अपमान नाही का? ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप बंद केली, काय हा ओबीसीचा अपमान नाही का? आम्ही ओबीसीची जातनिहाय गणना करणार नाही असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र लिहून दिले हा ओबीसीचा अपमान नाही का? 


देशातील सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात ओबीसीचे प्रतिनिधित्व नाही हा ओबीसीचा अपमान नाही का? देशातील अनेक संस्थांमध्ये ओबीसी नाहीत तर हा ओबीसीचा अपमान नाही का? देशातील अनेक विद्यापीठात ओबीसीचे प्रतिनिधित्व नाही हा ओबीसीचा अपमान नाही का? देशातील मीडियात ओबीसी नाही हा ओबीसीचा अपमान नाही का? स्वत: ओबीसी प्रधानमंत्री असताना ओबीसीची गणना केली जाणार नाही असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र लिहून देणारे केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकार, यापेक्षा ओबीसीचा कोण अपमान करू शकेल का? देशात आजच्या तारखेला ओबीसीचा सर्वात मोठा अपमान आरएसएस-भाजपावाले करत असल्याची टिप्पणी पटेल यांनी केली.


राम मंदिराच्या लढाईत सर्वात पुढे ओबीसीच्या लोकांना करण्यात आले आहे. त्यात विनय कटियार, कल्याण सिंग, उमा भारती, रूतंबरा, प्रवीण तोगडिया अशी कितीतरी नावे आहेत. देशभरातील तमाम ओबीसीचे नेते होते. आता मंदिर बनत आहे. सरकारच्या माध्यमातून ट्रस्ट बनवण्यात आला. त्या ट्रस्टमध्ये एकही ओबीसी नाही. काय हा आरएसएस-भाजपाच्या लोकांनी सन्मान केला? हा ओबीसीचा अपमान नाही का? 


प्रश्‍न असा आहे की, जे स्वत: ओबीसीचा अपमान करत आहेत, तेच ओबीसीचा अपमान झाल्याचा कांगावा करत आहेत, ओबीसीला फसवण्याचे काम करत आहेत. ओबीसीचे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आता ओबीसीला  या बाबी समजून येत आहेत. त्यामुळे या बाबी आम्ही स्विकारणार नाही. ओबीसीचा अपमान आम्ही सहन करणार नाही, म्हणून याविरोधात आम्ही आंदोलनाची घोषणा केल्याचे पटेल यांनी सांगितले.


यापूर्वी अनेकदा कॉंग्रेसचे सरकार आले, त्यांनी ओबीसीच्या गणनेला रोखण्याचे काम केले. स्वत: ओबीसी सांगून ओबीसीची गणना न करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे म्हणजेच आज ओबीसीचा सर्वात मोठा अपमान आरएसएस-भाजपा व नरेंद्र मोदी करत आहेत. ओबीसीचा अपमान होत असल्याने चार चरणात आंदोलन घोषित करण्यात आले होते. ही लढाई लढली जाईल. प्रत्येक ओबीसीपर्यंत ही बाब पोहचवली जाईल असे पटेल यांनी स्पष्ट केले.


केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने ओबीसीचे २७ मंत्री बनवले. आमच्याकडे अनेक मंत्री ओबीसी आहेत, आम्ही ओबीसीसाठी सर्वात जास्त काम करत आहोत, असे भाजपा दावा करते. परंतु २७ मंत्र्यांमधील एक मंत्री ओडीशाचे ते शिक्षणमंत्री होते. धर्मेंद्र प्रधान त्यांचे नाव आहे. ज्यावेळी नीटमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आला तेव्हा त्यांनी ओबीसीचे आरक्षणच गायब केले. यावरून लक्षात येते की, हे लोक पोझीशन देतात, पॉवर देत नाहीत. 


धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पॉवर असती तर त्यांनी नीटमध्ये ओबीसीला आरक्षण दिले असते. मोठे आंदोलन झाल्याने मोदींनी नौटंकी करत नीटमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला मान्यता दिली. केंद्रात अथवा राज्यात ओबीसींना मंत्री बनवण्यात येते ते मंत्री नसून त्यांना भाजपाचे प्रचारमंत्री म्हणून बनवले जाते. आपापल्या जातींमध्ये जा आणि सांगा की, आपल्या जातीला मंत्री बनवण्यात आले आहे. ओबीसीचा चेहरा दाखवून सारी मते भाजपाला द्या असे सांगण्यात येते. ओबीसीची मते लुटण्याचा हा कार्यक्रम आहे, कल्याण करण्याचा नाही.


निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी बजेट सादर केले, त्या बजेटमध्ये ओबीसीचे नावदेखील घेतले नाही. बजेटमध्ये ओबीसीसाठी काही तरतूद केली गेली असती तर त्यांनी नाव घेतले असते, मात्र तरतूदच केलेली नाही तर नाव कसे घेणार? काय हा ओबीसीचा अपमान नाही का? ओबीसीच्या लोकांना मंत्री बनवणे व ओबीसीच्या हक्क व अधिकाराचा निर्णय घेण्यापासून त्यांना रोखणे, केवळ प्रचार-प्रसार करून भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी त्यांचा उपयोग करणे हादेखील ओबीसीचा अपमान आहे. ही बाब ओबीसीच्या लक्षात येत आहे. केवळ चेहरा दाखवला जातो, मात्र ओबीसीच्या मंत्र्यांकडे पॉवर नाही अशा शब्दात पटेल यांनी हल्लाबोल केला आहे.


देशभरातील राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे पदाधिकारी भारत बंदच्या तयारीला लागले आहेत. देशभरातील एससी, एसटी, ओबीसीचे संघटन आहेत, त्यांनाही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांबरोबर न्याय व्हायला हवा, त्यांना हक्क व अधिकार मिळायला हवेत असा विश्‍वास ठेवणार्‍या संघटनांना आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातील आणखी एक मोठे संघटन भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्याशीही बातचित झाली आहे. त्यांचेही आम्हांला समर्थन मिळाले आहे. अनेक संघटनाही आम्हांला पाठिंबा दिला आहे. 


जातीआधारित जनगणनेच्या मुद्याला दाबण्याचे काम केले जात आहे. हा भारत बंद ऐतिहासिक असेल. ओबीसीच्या हक्क व अधिकाराच्या लढाईला कमजोर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ओबीसीची मते घेण्याचे सुतोवाच केले जात आहे, अशा परिस्थितीत हे आंदोलन महत्वपूर्ण आहे. सार्‍या ताकदीनिशी तयारी झाली आहे. हा ऐतिहासिक भारत बंद होणार असून, ओबीसीची जातनिहाय जनगणना न करणे हाच ओबीसीचा सर्वात मोठा अपमान असल्याचा आवाज सरकारच्या कानापर्यत जाईल असा विश्‍वास पटेल यांनी व्यक्त केला.  



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ईव्हीएम घोटाळ्यावरील चर्चेला डायव्हर्ट करण्यासाठी कें
भाजपा ईव्हीएम मॅनेज करते
‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘द केरला स्टोरी’ संघाचा सरळ अजे
चिंताजनक: राज्यात २४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य, ६० हजार श
वृत्तपत्रात जाहीरात न देण्यासाठी राजकीय पक्षांवर बडगा
महाराष्ट्रातून रोज सरासरी ७० मुली बेपत्ता, तीन महिन्यात
बीएमपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेन्द्र प्रताप सिंग यांच
पाटणा उच्च न्यायालयाची जातनिहाय सर्वेक्षणाला स्थगिती
उद्धव ठाकरे शेंडी-जानव्याचा उल्लेख करत असल्याने अल्पसं
छत्तीसगडमध्ये आता ५८ टक्के आरक्षण!
आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथा, पांढरपेशे असा उल्ल
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या भारत बंदने शासक वर्गाच
केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारविरोधात राष्ट्रीय पिछडा व
बरेच न्यायाधीश आळशी, वेळेवर निकाल लिहित नाहीत
ब्राम्हणांना महात्मा फुले यांच्या नावाची भीती का वाटते?
परिवर्तनाची मशाल पेटवणारे महात्मा फुले
ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला पुन्हा तारीख
देशाला बेेरोजगारीचा विळखा, कोरोनाने अर्थव्यवस्था गेली
न्यायदानात कर्नाटक अव्वलस्थानी! महाराष्ट्र ११ व्या स्थ
भारतात सामाजिक न्यायापेक्षा सामाजिक बदलानेच समस्यांचे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper